Saturday, October 9, 2010
Monday, May 3, 2010

चरखा......धागा धागा अखंड विणुया
एका आदर्श समाजाची परिकल्पना काय? याचा विचार करायचा म्हटले तर आपल्या अभ्यासाला, संशोधनाला सुरुवात तर होइल. मात्र, याचा निकाल आपल्या हातात कधी येइल याबाबत काही सांगू शकत नाही. कारण समाजातील विविध समस्या खुप वाढल्या आहेत आणि त्यावर वर वर चे उपाय योजून चालणार नाही. या समस्या पूर्ण नष्ट केल्या पाहिजेत. तेव्हाच आपल्या समाजाला धैर्य आणि गतवैभव पुन्हा प्राप्त होइल. यासाठी डॉक्टर श्री अनिरुद्ध जोशी यांनी १३ कलमी योजना जाहिर केल्या आहेत. या योजनावरच त्यांच्या संस्थेचे कार्य अवलंबून आहे. या १३ कलामंमधील पहिले कलम म्हणजे वस्त्र योजना अर्थात चरखा योजना
वस्त्र योजना अर्थात चरखा योजना
गरिबीमुले अंगभर नीट वस्त्रही घालता येत नाही अशी अवस्था प्रगतिशील भारतात आजही आहे. खेडेगावात राहणार्या सुमारे ४ कोटिहुन जास्त विद्याथार्नकड़े एकच गणवेश असतो. पुरेसे आणि टिकाऊ कपडे उपलब्ध नसल्याने शिक्षण पासून ती मुले वंचीत राहतात. गरजू विद्याथार्नकड़े आणि त्यांच्या परिवाराला आवश्यक कपडे पुरविण्यासाठी चरखा योजना जाहिर झाली.
अनिरुद्ध आदेश पथकाचे कार्यकर्ते स्वखर्चाने अम्बर चरखा विकत घेतात. त्यावर सूत कातातात. संस्था या सुतापासुन कापड तयार करते. या कपड्यापासून शालेचे गणवेश तयार केले जातात आणि त्यांचे विनामूल्य वाटप करण्यात येते.
